शुक्रवार, ४ ऑक्टोबर, २०१३

मला जगायचंय !

पुन्हा कधी तरी जाग आली ..... शरीर कशात तरी गुंडाळलेले .....हळू हळू नजर वर केली मला कळून चुकले मी इस्पितळात आ. य. सी. सी. यु. मध्ये आहे फक्त डोळ्यांची हालचाल शक्य ... डोक्यात विचारांचे काहूर माजलेले.... डोक्यात घणांचे घाव पडतायत.....
घरुन निघालो तेव्हाच रेनकोट घालायला हवा होता माझी बाईक पुलावर आली आणि पाऊस तांडव करत बरसू लागला. बाईक बाजूला उभी करून डिकीत ठेवलेला रेनकोट काढेपर्यंत मी साफ भिजून गेलो होतो......
तेवढ्यात मागून रो रो करीत येण्यारया ट्रकचा आवाज ......अरे हे काय मी अलगद हवेत तरंगतोय ..... माझी बाईक ची सुद्धा तीच गत..... मग विजेच्या खांबाला मीठी मारली खांदा, छाती बधीर.... तिथून खाली डिव्हायडरवरिल दगडावर डोके आणि मग पाठ आपटली .....संपूर्ण शरीतर विजेचा कल्लोळ, जणू आकाशातील वीज माझ्या शरीरात घर करून राहिलीये.... अणुंकुचीदार सुई टोचल्या प्रमाणे पाऊस शरीरात खोलवर घुसत होता .... कपड्यावरील चिखल आणि रक्त साफ धुवून काढत होत .... जोरात किंकाळी मारावी असे वाटत होत पण नाही शक्य झाले....निपचित पाठीवर पडून किती वेळ झाला कोणास ठाऊक.
कोणीतरी हाताला धरतय मनगट दाबतय …
"नाडी अजून मंद आहे."
" हो सर रात्री दोनदा डोळे हि उघडले होते पण थोडाच वेळ, पुन्हा ग्लानी आली."
" ठीक आहे. बहुतेक पुढचे १ ० / १ २ तास वाट पहावी लागेल मग धोका नाही. "
हे देवा! ते काय म्हणतायत म्हणजे अजून मृत्यूशी झुंज चालू आहे म्हणायची तर !
अरे हे काय अजून हि मी इस्पितळातच…. पण आता चांगले कळायला लागलय …. ती काय दरवाजाच्या काचेतून माझी पत्नी माझ्याकडेच डोळे लावून बसली आहे. रडून रडून तीचा चेहरा लाल झाला आहे तिचे डोळे सुजलेले दिसत आहेत…किती दिवस ती तिथून हलली नसेल… आमची नजरानजर झाली… ती दीनवाणी हसली आणि तिच्या डोळ्याला पुन्हा झरझर लागली …. मी डोळे मिटून एक आवंढा गिळला तेव्हा माझे दोन्ही कानावरील पट्ट्या ओल्या झाल्या...म्हणजे मीही रडत होतो….
आयुष्याच्या या प्रवासात मी अर्ध्या वाटेवर तिला आणि सोन्याला सोडून जाईन अशी धास्ती तिने नसेल ना घेतली.....
मला लग्नाचा दिवस ते आत्तापर्यन्तचा सर्व प्रवास आठवला… " आयुष्याच्या सर्व प्रसंगात एकमेकांना साथ करू" अशा शपथा आंम्ही लग्नाआधीही किती वेळा घेल्या होत्या…. मग आता का मी एवढा कृतघ्न झालो होतो,स्वार्थी झालो होतो.... तिला अर्ध्या वाटेवर सोडून निघून चाललो होतो....
माझ्या शिवाय सोन्याला घेवून ती कशी काय या संसाराचा गाढा हाकणार होती … मुलाला मोठे करून डॉक्टर / इंजिनेर करण्यासाठी एकटीच काबाडकष्ट करणार होति... माझ्या म्हातारया झालेल्या आई बाबांना सांभाळणार होती….
पुन्हा मी डोळे उघडले…. आता काचे पलीकडे तिच्या बरोबर माझा सोनुल्या पण तिच्या कडेवर होता … एक हात हलवून माझ्या कडे बघत राहिला…. जणू मला बाहेर बोलावत होता ज्याच्या अंगा खांद्यावर वर मी उड्या मारल्या तो बाबा असा निपचित कसा पडलाय?… असा प्रश्न त्याला बिचार्याला पडला असणार …....

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

मृत्युपत्र का व कसे

माणसाच्या जन्माबरोबरच त्याच्या मृत्यु हि जन्म घेत असतो. आणि त्या हर एखाद्यला मृत्युपत्र किंवा Will याबद्दल विचारले तर त्यात  वाईट किंवा नाराज होण्या सारखी गोष्टच काय? जो जन्माला आला तो कधी न कधी तरी जाणारच. आता जाण्या अगोदर संपूर्ण आयुष्यात त्याने  जे काही कमावलेले असेल,  भले तो माणूस लखपती, करोडपती नसेल त्याच्या वाटणीचे जे काही असते ते आपल्या पाश्चात कुटुंबातील जवळच्या व्यक्तीला मिळावे अशीच त्याची इच्छा असते. 
पण जर त्या व्यक्तीने आपले मृत्युपत्र तयार केलेले नसेल त्यातून मृत् पावलेली व्यक्ती कुटुंब प्रमुख असेल तर त्याच्या पाठीमागे जे  वारस पात्र उरतात, त्यांना खरा लाभ मिळेपर्यंत त्यांचे  हाल होतात, खूप मनस्ताप भोगावा लागतो, सर्व ठिकाणी मृत्युचा दाखला देवूनही प्रसंगी निराशा पदरी पडते आणि  लाभ मिळण्यास विनाकारण उशीर होतो. पण जर मृत्युपत्र केले असेल तर मात्र हि प्रक्रिया खूप सोपी कमी कालावधीत होते. आणि आजकालच्या धकाधकीच्या, असुरक्षित जीवनात जिथे कधी काय होईल याचा नेम नाही. अशा वेळी साधारण ५० शीच्या आसपास मृत्युपत्र केले तरी हरकत काहीच नाही.
मृत्युपत्राची नोंदणी कायद्याने आवश्यक नाही पण केलेली असल्यास चांगले , म्हणजे आपली प्रत गहाळ झाल्यास सरकारी कार्यालयातून खरी प्रत मिळू शकते

समाजात मृत्यूपत्र बाबत जे  गैरसमज आहेत, ते दूर करण्याचा एक प्रयत्न :-

१) मृत्यूपत्र करण्या साठी वकिलाची गरज नसते; साध्या फुलस्केप पेपर वर किवा A४ साईझ पेपर वर  सुद्धा ते करता येते. कोर्ट फी,  स्टंप पेपर याचीही काही जरूर नाही.
२) तुम्ही स्वतः आयुषयात कमावलेल्या सर्व चल- अचल (Libalities & Assets) चा त्यात समावेश करावा.
३) जर वारस आज्ञानी, लहान , किवा मतीमंद असेल तर मृत्यूपत्र द्वारे एक विश्वस्त नेमावा जो सर्व प्रकारे अंमलबजावणीस जबाबदार असेल. 
४) तुमचे मृत्युपत्र हे केव्हाही रद्द करता येते व बदलता  येते, किंवा त्यात प्रसंगानुरूप हवे तेव्हा,  हवे तेवढे बदलही करता येतात. पण नवीन मृत्युपत्रात , जुने मृत्युपत्र (तारखेचा उल्लेख करून) रद्द कले असे नमूद करावे अथवा ते फाडून नाहीसे करावे. 
५) मृत्युपत्रावर किमान दोन विश्वस्तांची / साक्षीदारांची सही त्यांच्या नाव पत्ता सहित घ्यावी , पण जे वारस असतील ते विश्वस्त म्हणून सहीला पात्र नाहीत हे  लक्षात घ्यावे. 
६) मृत्युपत्र बनवल्यावर त्याची माहिती सर्व वारसांना  द्यावी व त्यांना माहित आहे अशा ठिकाणी मृत्युपत्र  ठेवावे. 
 आपल्या माहितीकरिता खाली मृत्युपत्र नमुना देत आहे. जर मायाजाल वरून थेट हवे असेल तर मृत्युपत्र क्रमांक-१ साधे मृत्यूपत्र साठी  इथे  टीचकी मारा.


श्री. बेरारकर काका ......

मी जेव्हा पाचवी ते सातवी कळव्याच्या ज्ञानप्रसारणी शाळेत शिकत होतो तेव्हाचा माझा एक मित्र श्याम बेरारकर हा मला आठवतो. त्यावेळी नुसता आमच्या वर्गात नाही तर सर्व शाळेत आपल्या हसतमुख , खोडकर गमत्या स्वभावाने परिचयाचा होता. सतत डावा हात अडवा करून आपली खाली सरणारी शाळेची खाकी विजार (Pant) सावरत असायचा जोडीला  सु, सु, करीत नाकाने आवाज करीत श्वास घ्यायचा.